Breaking News
Loading...
Monday, 21 December 2009

Info Post
तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं
कधी मी जिंकावं म्हणून तुला एकदा तरी हरताना पाह्यचं होतं

तुझ्या वाटेवर शिणलेल्या त्या डोळ्यांना
माझ्या आठ्व्हनिनी तुझ्या डोळ्यात पाणी पाह्यचं होतं

तुला नुसतं त्या हिरव्या शालूत पाह्यचं नह्व्त
तर तुझ्या हातावर काढलेल्या म्हेन्दीत माझं नाव शोधायचं होतं

तुझ्या हातात भरलेला हिरव्या चुडया सोबत
तुझ्या कपाळी माझ्या नावचं कुंकू लेह्लेलं पाह्यचं होतं

चार चौघात तुला माझी म्हणून मिरवायचं नह्व्त
तर महाबळेश्वरच्या त्या गुलबी थंडीत हि फिरवायचं होतं

सगळच जर एकतर्फी असतं तर काहीच वाटलं नसतं
पण तेव्हा तुला माझ्या जीवाशी खेळताना काहीच कसं वाटत नह्व्त
काहीच कसं वाटत नह्व्त .......................

0 comments:

Post a Comment