कमळपत्रा वरील पाण्याला कधी थांब म्हणायचं नसतं
नीसटणार्या क्षणांना कधी जवळ करायचं नसतं
माणसाच आयुष्य हे असच असतं
बाकी काहीही हरवलं तरी, त्यापेक्षाही जास्त उरलेल असतं.
काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात,
कदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात.........
0 comments:
Post a Comment
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.